...........खेळ कुणाला दैवाचा कळला?...........
दैव !!! दैव जाणीले कुणी? मुळात दैव म्हणजे काय ? ते कुणी बघीतलय ? त्यावर का बरं विश्वास ठेवायचा? असे अनेक प्रशन उठतात.
या सर्वांची शहानिशा करून मग आपण कुठलातरी निर्णयाप्रत येउ शकतो.
दैव म्हणजे नशीब. हे नशीब सटवी बाळाच्या कपाळावर लिहीते म्हणे की जे आपल्याला दिसत नाही. आणि त्याप्रमाणेच त्या व्यक्तीच्या आयुष्यात घटना घडत जातात. आपण निमित्तमात्र असतो. मग हे सर्व जर आधीच ठरलेलं असेल तर आपण स्वता हून काही करायची गरजच नाही ना. असं म्हणून चालेल का? नाही चालणार. हे जे दैव किंवा नशीब आहे ते मागील जन्माच्या पापपुण्याची गोळाबेरीज करून उरलेल्या पाप व पुण्यानुसार व मागील जीवनातील व्रुत्तीनुसार या जन्मासाठी केरी फॉरवर्ड केलेले असते.
आता परमेश्वराने आपल्या दैवाबरोबरच आपल्याला खूपशा सवलती/ फेसीलीटीज दिल्या आहेत की ज्या वापरून आपण काहीही करू शकतो. आपलं नशिबही बदलू शकतो. ते आपल्या कर्तुत्वावर अवलंबून आहे. एखाद्या बेंकेत आपली मागील शिल्लक पुढील वर्षासाठी केरी फॉरवर्ड करावी. व मेनेजरनी मागील वर्षातील व्यवहार पाहून याचं पुढील वर्ष कसं जाइल याचा एक लेखाजोखा लिहून ठेवलेला असतो. त्यालाच आपण आपल्या जीवनाच दैव म्हणतो. मग आता आपणास दैवाबाबतचा कल्पना मला वैयक्तीक वाटतात त्या स्पष्ट झाल्या असतील व मग आता आपण जीवन कसं जगायचं याचाही विचार झटकन आपल्या मनात आला असेल. दैवाचं जीवनातील स्थान किती व कसं आहे व त्यानुसार आपण त्याला किती व कितपत महत्व द्यायचं हेही लक्षात आलं असेल.
मग आता कळला ना दौवाचा खेळ काय असतो
नमस्कार.
No comments:
Post a Comment